Posts

Notification काढल तर बरं होईल

 साहेब आमच्या मुद्द्याच राजकारण करण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, साहेब आम्हाला Meeting च आश्वासन देण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल,  काहीच नाही मागितलं , फक्त अभ्यासासाठी थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे notification काढलं तर बरं होईल, प्रत्येकालाच आमच्या प्रश्नाविषयी खरच मनापासून कळवळा आहे, पण notification काढलं तर बरं होईल, इथे चांगले चांगले मोठे मोठे लोक खूप काही चांगलं चांगलं बोलून गेले, पण notification काढलं तर बरं होईल, Meeting आपण मागच्या महिन्यात सुद्द्धा घेतलीत, cabinet ने निर्णय सुद्धा घेतला आहे, आता notification काढलं तर बरं होईल. आमचं काय ओ साहेब , आमच्या समोर आज हा leader उभा आहे , उद्या दुसरा कुणीतरी येवून उभा राहील आणि परवा तिसरा कुणीतरी येवून उभा राहील, आमच्यासाठी सगळ्यांनाच मनापासून कळवळा आहे पण तेवढं notification काढलं तर बरं होईल... सुदर्शन जायभाय 

Mysterious Life and Support system

Image
 Life is a mystery. जीवन हे एक रहस्य आहे.. तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होवू शकत... चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील...खूप चांगले क्षण असतील, आणि खूप खूप वाईट phases पण असतील. तुमच्या life वर हजारो रंगांची उधळण केलेली आहे.. कधीही कोणताही रंग तुमच्यासमोर कसा प्रगट होईल, हे कुणीच सांगू शकत नाही... खरच life ही एक mystery आहे, एक रहस्य आहे.... तुमच्या life कडे कधीतरी एका broad view ने बघायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला पण कळेल की तुम्ही आता पर्यंत जे काही 20-25-30-35 वर्ष जगला आहात, त्या कडे जर तुम्ही बघितलं तर अस जाणवेल की कसले कसले प्रसंग तुम्ही पचवले आहेत,भोगले आहेत, सोसले आहेत...चांगलं वाईट सगळच बघितलं आणि अजून बघाल पुढे पण... एवढं सगळं मी आज का व्यक्त होतोय तर मला माझा इथे एक perspective मांडायचा आहे की life हे एक रहस्य आहे, समजण्यापलीकडे आहे...आपल्याला हे life भेटल आहे, ह्याला रहस्या सारखच treat करूयात, respect करूयात....कसल्याही गोष्टीचा ताण येत असेल , नको नको होत असेल तर त्याच एवढं मनावर घेवू नका (मग ते काहीही असो) .. तुम्ही 25-30 वर्ष जगलात , अजून 25-30 वर्ष जगाल आण...

आपण नशीबवान आहोत

आयुष्य जस असेल तस accept करून ते सुंदर करण्यावर आपण भर द्यायला पाहिजे. मनाला नको असलेल्या गोष्टी होतच राहतील आयुष्यात, कूनाचच आयुष्य perfect नाहीये, कुणाच्याच आयुष्यात 100% मनासारखं झालेल नाहीये, वाटल्यास आपल्या आजूबाजूला विचारा कुणाला पण. कारण आपल्या मनाला निसत काही ना काही हवं असतं, आपल्या इच्छा endless आहेत...तुम्हाला आत्ता bike हवी असेल आणि ती मिळाली तर तुम्हाला चार चाकी हवी असते, ती मिळाली की तुम्हाला त्यातली भारी वाली महागडी गाडी हवी असते...आपल्या इच्छा आकांक्षाना मरण नाही, त्या सतत आपल्याला, आपल्या हृदयाला ,आपल्या मनाला जाळत असतात, आणि आपण त्यात नकळत जळत असतो...मला जेव्हा अशा इच्छा अस्वस्थ करून सोडतात तेव्हा मी पुण्यात झेड ब्रिज खाली राहत असलेल्या लोकांकडे जावून त्यांना एकटक बघत बसतो आणि विचार करतो की त्यांच्या life मध्ये किती गोष्टी कमी आहेत, आणि मला तर देवाने इतकं भरभरून दिलंय तरी मी असा का जळतोय या इच्छांपायी..थोड मन शांत होत तेव्हा... कधी कधी अस वाटू शकत की डोक्याचं दही होत चाललंय, कळत नाही कुणाशी कस वागायचं, कस बोलायचं , अस वाटत की आपण वेडे आहोत किंवा मानसिक रोगी तर नाही, त...

Girls aspirants जन्मा तुमची कहाणी..(By Punam Ahire)

  कधी नव्हे ते परीक्षा केंद्रावर निवांत वाटतं होतं ,त्यामुळे आजूबाजूच्या जगाचे जरा भान होते आज (बहुधा जागा जास्तच वाढल्याने असावं.) सालाबादाप्रमाणे exam hallमध्ये घुसेपर्यंत वाचायची सवय म्हणून विज्ञानाच्या micronotes घेऊन  exam centre च्या बाहेर वाचत बसलेली.. प्रसंग1- उजव्या हाताला एक चाळीशी-पन्नाशीतील एक काकू येऊन बसल्या, त्यांची मुलगी exam centre मध्ये गेलेली,सगळे candidate मध्ये जात होते पण मी काही हलेना म्हणून मला म्हटल्या," तुझी नाही का परीक्षा?" मी म्हटलं आहे ना काकू, पण मला उशीरा आत जायला आवडतं ,जेणेकरून जास्तवेळ बसावं लागतं नाही ताटकळतं, त्या म्हटल्या मी वणीहून आलीय मुलीसोबत..मला मनोमन कौतुक वाटलं  कारण एकंदरीत भाषा व राहणीमान यावरुन  शेतकरी  वाटतं होत्या अन् शेतकरी महिलांना घरातच अन् शेतात पुष्कळ काम असतात तरी त्या काकूंनी मुलीच्या परीक्षेला प्राधान्य दिलं अन् तिला परीक्षेसाठी प्रवासात सोबत अन् मानसिक आधार द्यावा म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली..आज काल WFH वाले तर सगळीकडे laptop घेऊन दिसत असताना त्या आईचं मुलींच्या परीक्षेला प्राधान्य देणं मनाला खुप भावून...

"तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना"

 काही अनुभव  ह्रदयावर कोरून ठेवायचे असतात..त्यातलाच हा एक..(थोडा त्रासदायक होता म्हणून परीक्षेनंतर लिहितेय) 21 मार्च 2021चा दिवस  होता. यथावकाश म्हणत म्हणत  एक्झाम तब्बल वर्षभर उशिरा होत होती.. High alert मध्ये पेपरला निघालेली मी.. सगळं लक्ष त्या  चार तासांवर होतं. पहिला पेपर झाला , थोडा वेगळाच होता पेपर पण पुढच्या पेपर वर भिस्त ठेवून स्वतःचे अवसान सांभाळत होती..csat च्या पेपर जाताना हळूच ती मागून अन् विचारलं , "ऐ तू दिशा आहेस ना ?" मी चरकलेच  एवढ csat alert अन् मास्क असताना कोण मला ओळखत इथवर  आलं..पाहिल तर ती पंजाबी ड्रेस घातलेली , गळ्यात मंगळसुत्र असलेली एक  मुलगी...माझी  अगदी लहानपणीची  वर्गमैत्रीण "मधू".. बालपणी म्हणजे अगदी तिसरी चौथीला एका वर्गात असू बहुधा अन् शाळेत पहिल्या दोन तीन क्रमांक राहायचो आम्ही त्यामुळे  खास ओळख..नंतर शाळा बदलल्या शहरं बदलली , तब्बल 16-17 वर्षानी तेही mpsc centre वर भेट  ...म्हणे," अगं मी तुला सकाळीच पाहिलं  पण तुझं लक्ष नव्हतं"..अगदी जुजबी बोलून  आम्ही परीक्षेला पळालो............. ह्यान...

प्रवास

 Journey has to be completed.  प्रवास पूर्ण कराच. प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल.  कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि  प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed. अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत.   आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे.. फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात.. कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाक...

या ह्रिदयीचे त्या हृदयी

 तू तुझ्या समजुतीने अर्थ काढशील माझ्या शब्दांचे मी लिहित राहील माझ्या कुवती प्रमाणे माझे शब्द त्या दोन शब्दामध्ये भेटेल तुला काहीतरी  जे भेटलं नसेल कुणालाच कुठे सापडलं तुला ते तर नक्की कळव मला मी इथेच आहे शब्द तर साधन आहेत शब्द एक आधार आहेत शब्द कुबड्या आहेत काहीतरी मला पोचवायच असतं तुझ्यापर्यंत पण तुझ्या समजुतीने तू समजुन घेतोस/घेतेस दुसरच काहीतरी या हृदयीचे त्या हृदयी घालणं पण होत असतं अधून मधून पण कमी वेळा बहुतेकदा माझ्या कुवतीने लिहिलेलं तुला समजत दुसऱ्याच अर्थाने तुझ्या समजुती नुसार.. शब्दांच जंगलच हे अडकलोय यात मी आणि तू पण शब्द नावाला नुसते खर जे आहे ते काही वेगळंच आहे ते न सांगता ही कळतं असतं, जाणवत असतं त्या खऱ्याला कसल्याच आधाराची गरज नसते कारण ते खर असतं ते पोहचत जिथं पोचायचं तिथे अगदी वेळेवर  काहीतरी हृदयी घालायचा भाबडा प्रयत्न परत केला आहे मी बघ काही भेटतय का तुला त्या दोन शब्दामध्ये तुझ्या समजुती नुसार सापडलं तर नक्की कळव मला मी इथेच आहे भेटलं तर ठीक नाहीतर दे सोडून - सुदर्शन  11.18 pm,  25 August, पुणे

जगण यमुना आजीचं .......

Image
 "हरीच्या मुरलीवर जीव जडे ,    संसार सुख दु:खाचा विसर पडे"  शेताच्या बांधावर झाडाखाली पोत टाकून बसलेली 'यमुना आजी' ही गवळण गुणगुणत होती . श्रवणीय असा आजीचा आवाज एकूण येणारी जाणारी सुद्धा काही काळ रेंगाळून पुढे जात होती . तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर जगण्याचा शहाणपणा घेऊन बेताच्या परिस्थितीतही ताठ मानेने जगणारी यमुना आजी ... !. आजीची परिस्थिती सुरुवातीपासूनच जेमतेम होती. त्या काळानुसार तिचे लहान वयात लग्न झाले. नवरा शेतकरी, दोघं कष्टाची भाकर समाधानानं खात. वाट्याला आलेली शेतीही जेमतेम तुकडाभर..! त्यातून शेतीचा कारभार सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बेजार .....पण दोघांनीही चिकाटीने संसार फुलवला. दुसऱ्याच्या शेतात कधी मजुरी करून, कधी इकड-तिकडची बारीक-सारीक काम करून पै-पै जोडली . शेतीचा बिन भरवशाचा उद्योग ह्या दोघांनी ओळखून साठवलेल्या पै- पै मधून आजोबांनी रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा हॉटेल टाकण्यासाठी छोटीशी जमीन खरेदी केली. घरात आता खाणारी तोंड वाढली होती . दोन मुले, एक मुलगी ही यमुना आजीच्या संसारवेलीवर आलेली फुल होती. प्रतिकूल परिस्थितीतही दोघं कष्टाने सार सावरत...

संगीत आणि मनातले विचार (By Ashwini Bhosale)

Image
  स्वर - तालाच्या दुनियेत मानवी मन अगदी सहज रममाण होतं असतं. असा एकही मनुष्य नसेल की त्याला यातलं एकही आवडत नसेल . अगदी सर्वात निरस व्यक्तीला सुद्धा यातला एखादा तरी प्रकार नक्कीच आवडत असेल. प्रत्येक स्वराचे, प्रत्येक तालाचे त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, त्याला स्वतःचे एक अस्तित्व आहे . तालाचे योग्य मिश्रण हे उत्तम संगीत बनू शकते तर स्वरांचे योग्य मिश्रण एक गाणं बनवू शकते. या तालाची गंमत म्हणजे यांची गुंफण योग्य होण.... एखादा ताल वेगळा आला तर कदाचित संगीताची लय बदलू शकते आणि कदाचित ते अगदी अश्रवणीय ठरू शकते किंवा कदाचित ते उत्तम आश्चर्य असलेले सुद्धा होऊ शकते.  मग याची खातरजमा तुम्हाला स्वर तालाची प्रॅक्टिस करतानाच करावी लागते. तसेच डोक्यातील विचारांचे असते जसे संगीतात अनेक स्वर-ताल आहेत, तसेच डोक्यात अनेक विचार आहेत.. दररोजच्या जीवनात एक विचारमाला सतत सुरू असते.  त्यात अनेक विचार येत असतात पण कुठला विचार हा विचारमालेत ठेवून जीवनाचे संगीत उत्तम करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे ... विचार अनेक येतील  पण असेच विचार निवडावे लागतील ज्यांची विचार शृंखला उद्याच्या उज्ज...

How many deaths will it take 'till he knows That too many people have died?

Image
  How many deaths will it take 'till he knows That too many people have died? प्रेमात सुंदर क्षण बोलतात डोळे झाकता हे क्षण उमलतात माझे नाही तुझे असे सांगता त हे सुदंर क्षण अर्थ उमगतो कधी तुझ्या नसण्याचा कधी तुझ्या असण्याचा सर येते पावसाची कधी उन्हाळ्यात सावलीची झाडाखाली बस आणि हे सुंदर क्षण बघ थांबूनी सुंदर च हे सगळं पण डोळे नसतात स्तब्ध ते पाहण्याकरता दिसत नाही म्हणून हे सगळं थांबलेलं सगळं थांबलेलं च असतं थांबलेली माणसं, थांबलेली झाड, आणि थांबलेलं मन पण आपणच पळतो पळतो हातच सोडून सैरभैर.. थोड स्थिरावलो तर कदाचित दिसेल अखंड शांतता थोड स्थिरावलो तर होईल खऱ्या सुंदरतेचे दर्शन थोड थांबलो तर विसावेल थोड थांबलो तर अर्थ समजेल थोड थांबलो तर थांबून कदाचित ऐकू येतील बोल अंतरीचे थांबतो थोड स्थिरावतो थोड  _ सुदर्शन जायभाय