आपण नशीबवान आहोत
आयुष्य जस असेल तस accept करून ते सुंदर करण्यावर आपण भर द्यायला पाहिजे. मनाला नको असलेल्या गोष्टी होतच राहतील आयुष्यात, कूनाचच आयुष्य perfect नाहीये, कुणाच्याच आयुष्यात 100% मनासारखं झालेल नाहीये, वाटल्यास आपल्या आजूबाजूला विचारा कुणाला पण. कारण आपल्या मनाला निसत काही ना काही हवं असतं, आपल्या इच्छा endless आहेत...तुम्हाला आत्ता bike हवी असेल आणि ती मिळाली तर तुम्हाला चार चाकी हवी असते, ती मिळाली की तुम्हाला त्यातली भारी वाली महागडी गाडी हवी असते...आपल्या इच्छा आकांक्षाना मरण नाही, त्या सतत आपल्याला, आपल्या हृदयाला ,आपल्या मनाला जाळत असतात, आणि आपण त्यात नकळत जळत असतो...मला जेव्हा अशा इच्छा अस्वस्थ करून सोडतात तेव्हा मी पुण्यात झेड ब्रिज खाली राहत असलेल्या लोकांकडे जावून त्यांना एकटक बघत बसतो आणि विचार करतो की त्यांच्या life मध्ये किती गोष्टी कमी आहेत, आणि मला तर देवाने इतकं भरभरून दिलंय तरी मी असा का जळतोय या इच्छांपायी..थोड मन शांत होत तेव्हा... कधी कधी अस वाटू शकत की डोक्याचं दही होत चाललंय, कळत नाही कुणाशी कस वागायचं, कस बोलायचं , अस वाटत की आपण वेडे आहोत किंवा मानसिक रोगी तर नाही, त...